Tuesday, October 9, 2018

पावसाळा - Rainy

३ मुख्य ऋतूंपैकी एक . अत्यंत सुखद असा ऋतू . अंगाची लाही लाही करून टाकणाऱ्या उन्हाळ्यात ह्या सुखद ऋतूची खूप जास्त आठवण होते . घामापेक्षा , थंड पावसाच्या थेंबाने कधिएकदा अंग भिजेल ह्याची आतुरता जास्तच होते .
रुक्ष अश्या वातावरणातून मस्त हिरवळीत जाण्याची ओढ जास्त सुखद असते . मस्त हिरवळ , डोंगरकपारीतून झुळूझुळू वाहणार पाणी , हवेतील हवाहवासा असलेला गारवा ; हे सगळं खूप म्हणजे खूपच सुखद असत . 
पण ,
आजची परिस्थिती अशी आहे कि प्रत्येक ऋतू हा " #अति " होतोय . पाऊस यावा म्हणून विविध प्रकारचे तोटकेही वापरले जातात . आला आला म्हणत , कधी थांबशील रे पावसा असं म्हणण्याची वेळ येतेय (काही प्रदेशामध्ये) .
काही ठिकाणी तर १ - २ पावसातच पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते , रस्ते खचतात , घर पाण्यात जातं , माणसं वाहून जातात , गाड्या वाहून जातात , ढगफुटी होण्याचं प्रमाण मागील काही वर्षात वाढलंय (माळीण गावचं उदाहरण विसरू शकत नाही) .
मुंबई मध्ये तर १ - २ पावसात रस्ते पाण्याखाली जातात . कुठे गुडघाभर कुठे गळ्यापर्यंत पाणी साचत .
जुन्या लोकांना विचारलं तर , आमच्यावेळेस हे अस होत नव्हतं हे उत्तर मिळत . मग आताच का अस होतंय ? याचा कधी कोणी विचार केलाय का ?
पाणी निचरा व्हायला जमीनच नाहीये , सगळीकडे सिमेंटचे जाळे पसरले आहे .कस काय पाणी मुरेल . नाल्या तुंबलेल्या असतात . प्रशासनाला तरी कुठपर्यंत दोष देत बसणार आपण . आपली पण नागरिक या नात्याने जबाबदारी आहेच कि . कचऱ्यावर नियंत्रण आणि त्याच वर्गीकरण हे एवढंसं केलं प्रत्येकाने तरी बराच फरक पडेल . असो
मूळ मुद्दा म्हणजे जुन्या लोकांच्या म्हणण्यानुसार आधी असं होत नव्हतं ...मग आपल्याच नशिबी का ?
माणूस जेव्हडा निसर्गाशी खेळेल , जेव्हडी निसर्गाची हानी करेल ; निसर्गाचा कोप हा असाच होत राहणार . योग्य वेळीच आपण निसर्गाची काळजी घेऊन निसर्ग संगोपन घेऊया . वृक्ष तोड एवढ्या मोठ्या प्रमाणात चालूय , निसर्गाशी घेतोय आपण पंगा म्हणून निसर्ग असा घालतोय दंगा . (आत्मपरीक्षण करणं खूप गरजेचं आहे) .
उष्माघाताने जीवितहानी , पुरात वाहून जीवितहानी & वित्तहानी हा निसर्गाचा कोप नाही तर दुसरं काय आहे .
अजूनही आपण यातून सावरू शकतो .
वृक्ष लागवड , त्यांचं संगोपन , पावसाच्या पाण्याचं योग्य पद्धतीने साठवण ; अश्या गोष्टींमुळे निसर्गाचा समतोल राखण्यास नक्कीच मदत होईल .
प्रत्येक वर्षी प्रत्येक ऋतूतील होणारा हाहाकार आपण पाहतोच , ऐकतोच . यावर लवकरात लवकर उपाय करणे खूप गरजेचं आहे . 

No comments:

Post a Comment