काही दिवसापूर्वी एक जोक वाचण्यात आला , -
" #बेरोजगार" या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलप्रमाणे ;
.
.
.
.
" आमचा युवा नेता , युवकांचे आधारस्थान , युवकांचे भाई , युवकांच काळीज , युवा लीडर , युवा डॉन ,
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस ,गावची युवा तोफ , भावी सरपंच , भावी नगरसेवक , भावी आमदार , खंबीर नेतृत्व ..." 😁😁🤣
.
.
.
.
" आमचा युवा नेता , युवकांचे आधारस्थान , युवकांचे भाई , युवकांच काळीज , युवा लीडर , युवा डॉन ,
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस ,गावची युवा तोफ , भावी सरपंच , भावी नगरसेवक , भावी आमदार , खंबीर नेतृत्व ..." 😁😁🤣
हसण्यासाठी जोक नक्कीच चांगला आहे . पण यातलं गांभीर्य ओळखलं तर खूपच विदारक परिस्थिती आहे ही.
"#बेरोजगार" या शब्दातच अतिशय भयानक विदारकता लपलेली आहे . याच गांभीर्य ओळखायला वरील नेतेमंडळीला वेळ लागतोय , आणि त्यातच त्यांचा वापर करून घेणाऱ्या राजकारण्यांचा डाव साधला जातोय .
आज बऱ्याच ठिकाणी नौकरी मेळावे किंवा रोजगार मेळावे भरवले जातात . ( अर्थातच , राजकीय फायद्यासाठीच ) . पण अश्या मेळाव्यांना खेडोपाड्यातून आपल्या लेकरांना उन्हातान्हात घेऊन येणारे पालक पहिले तर , ह्या "#बेरोजगार" शब्दाची विदारकता समजते .
काही दिवसापूर्वी माझा एक मित्र कुठल्यातरी नौकरीच्या परिक्षेनिमित्त मुंबईला गेला होता . रिक्त पदे जेमतेम १५०-२०० होती . परीक्षेसाठी फॉर्म भरलेल्या "#बेरोजगार" विद्यार्थ्यांची संख्या ही जवळपास २०००० एव्हडी होती . माझ्या मित्राचा फॉर्म न. १७५०० च्या पुढे होता .
तो मित्र मला बोलला कि ; ' काही विद्यार्थी हे नागालँड , मणिपूर या राज्यातून आलेले '.
तो मित्र मला बोलला कि ; ' काही विद्यार्थी हे नागालँड , मणिपूर या राज्यातून आलेले '.
केव्हडी ही #बेरोजगारी आणि कुठपर्यंत ह्याची झळ पोचलीय याचा अंदाज लावण्याचा मी प्रयत्न केला , फेल झालो अंदाज लावण्यात .
ह्या बेरोजगारीमुळे तरुणाईची मानसिकता नक्कीच बदलत आहे . रोजगार उपलब्ध करून देणे , नौकऱ्याची उपलब्धता करून देणे हे राज्यकारण्यांचं काम आहे . पण हेच राजकारणी गिधाडं ह्या तरुणांना - " ह्याचा अध्यक्ष , ह्याचा उपाध्यक्ष , ह्याचा सदस्य , इथला नेता , इकडचा प्रमुख , तिकडचा नेता " असली उपाधी देऊन नादाला लावतात . पर्यायाने त्यांची कामे करवून घेतात .
ह्या बेरोजगारीमुळे तरुणाईची मानसिकता नक्कीच बदलत आहे . रोजगार उपलब्ध करून देणे , नौकऱ्याची उपलब्धता करून देणे हे राज्यकारण्यांचं काम आहे . पण हेच राजकारणी गिधाडं ह्या तरुणांना - " ह्याचा अध्यक्ष , ह्याचा उपाध्यक्ष , ह्याचा सदस्य , इथला नेता , इकडचा प्रमुख , तिकडचा नेता " असली उपाधी देऊन नादाला लावतात . पर्यायाने त्यांची कामे करवून घेतात .
त्यांची गरज संपल्यानंतर हेच राजकारणी मंडळी , ह्याच " अध्यक्ष , उपाध्यक्ष , सदस्य , नेते " ह्यांना अलगद बाजूला करतात .
ह्याची असंख्य उदाहरणे आहेत , तरीपण आजकालच्या तरुणांना ह्याच भान नाहीये .
ह्याची असंख्य उदाहरणे आहेत , तरीपण आजकालच्या तरुणांना ह्याच भान नाहीये .
का आणि कशामुळे ह्यांच्या मागे फिरायचं ? का आणि कशामुळे ह्यांचा उदो उदो करायचा ? का आणि कशामुळे एव्हडं लाचार व्हायचं ?
तरुणाईचा जेव्हडा वेळ ह्या राज्यकारण्यांची लाळ पुसण्यात जातो , तेव्हडाच मौल्यवान वेळ जर स्वतःच्या आयुष्यासाठी आणि भविष्यासाठी तरतूद करण्यासाठी खर्च केला तर नक्कीच फायदा होईल .
तरुणाईचा जेव्हडा वेळ ह्या राज्यकारण्यांची लाळ पुसण्यात जातो , तेव्हडाच मौल्यवान वेळ जर स्वतःच्या आयुष्यासाठी आणि भविष्यासाठी तरतूद करण्यासाठी खर्च केला तर नक्कीच फायदा होईल .
ह्या राजकारण्यांचा खेळ आणि तमाशा फक्त निवडणूक डोक्यात घेऊन केलेला असतो .ह्यांच्या हातातील बाहुल्या बनून राहण्यापेक्षा " वेळ पडलीच तर बूट पॉलिश करून स्वाभिमानाने २ पैसे कमावलेले कधीही चांगलं ".
सांगण्याचा उद्देश एवढाच आहे माझा , कि - तरुणाईने " रोजगार , नौकरी , उद्योग धंदा ' ह्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे .
आज जग खूप म्हणजे खूप फास्ट गतीने पुढे जात आहे , त्या जगाच्या गतीला मॅच होण्यासाठी सर्वानी धडपड करावी . बाहेरच्या जगात जगणासाठीची स्पर्धा ही दिवसेंदिवस वाढतच आहे . आज ह्या स्पर्धेत टिकण्यासाठी चालण्याची नाही तर धावण्याची गरज आहे . त्यासाठी जेवढ लवकर प्रयत्न चालू कराल तेव्हड चांगलं .
एक लक्षात असू द्या " मित्रांनो / मैत्रिणींनो " आयुष्यात सगळ्या गोष्टी कदाचित परत मिळू शकतील पण " गेलेला वेळ " कधीच परत मिळणार नाही .
आजच्या आयुष्यात सर्वात महत्वाचं काही आहे तर " वेळ " . म्हणूनच तो " मौल्यवान वेळ " ह्या नेतेमंडळींच्या मागे मागे फिरण्यात वाया घालवू नका .
आज जग खूप म्हणजे खूप फास्ट गतीने पुढे जात आहे , त्या जगाच्या गतीला मॅच होण्यासाठी सर्वानी धडपड करावी . बाहेरच्या जगात जगणासाठीची स्पर्धा ही दिवसेंदिवस वाढतच आहे . आज ह्या स्पर्धेत टिकण्यासाठी चालण्याची नाही तर धावण्याची गरज आहे . त्यासाठी जेवढ लवकर प्रयत्न चालू कराल तेव्हड चांगलं .
एक लक्षात असू द्या " मित्रांनो / मैत्रिणींनो " आयुष्यात सगळ्या गोष्टी कदाचित परत मिळू शकतील पण " गेलेला वेळ " कधीच परत मिळणार नाही .
आजच्या आयुष्यात सर्वात महत्वाचं काही आहे तर " वेळ " . म्हणूनच तो " मौल्यवान वेळ " ह्या नेतेमंडळींच्या मागे मागे फिरण्यात वाया घालवू नका .
वेळेचा सदुपयोग करा . " #बेरोजगार " या टॅग मधून मुक्त होऊन " नौकरदार , उद्योजक , स्वावलंबी " ह्या टॅग खाली येण्यासाठी " वेळ खर्च करा "
_/\_
rups.515@gmail.com
No comments:
Post a Comment